कधी कधी या जगण्याच्या धावपळीत … थोड थांबून माग वळून पहावं …श्वास घ्यावा आणि आपणच आपला विचार करावा … त्रयस्थपणान.. तर आपल्यातल्या चुका ..बेरीज वजाबाक्या आपसूकच कळून येतात … इथ पर्यंतच्या प्रवासात सोबत केलेल्यांची उजळणी .. कडूगोड प्रसंग .. बरे वाईट अनुभव या सगळ्याचा जमाखर्च करून मग पुढच्या प्रवासाला सज्ज व्हावं … पुढचा प्रवास नक्कीच सोपा होवून जातो …या सगळ्या शिदोरीवर …सविता १३ जुलै २०१३
Pingback: कधी कधी .. | savitasatish